खरे तर संगीत नाटक हा विषय घेऊन सिनेमा बनवणे हे एक आव्हानचं, पण रवी जाधव आणि सहकारयांनी हे आव्हान लीलया पेलले आहे.
नितीन देसाई यांचे सेट्स आणि प्रोजेक्शन म्हणजे अप्रतिमच. फार कमी वेळा अशी भव्य दिव्य कलाकृती पाहायला मिळते आणि ती पण मराठी चित्रपटात.
सुबोध भावेंचे कौतुक करावे तेवढे थोडेच. फारच सुंदरतेने निभावलाय सुबोध ने बालगंधर्व. संगीत,गायकी(आनंद भाटे) सारेच अगदी सरस.
म्हणून एकदा तरी थीएटरलाचं जाऊन बघावी अशी हि निर्मिती. आता खरेच मी म्हणेन मराठी सिनेमाला चांगले दिवस आलेत J
* * *
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment